महाराष्ट्र

राजर्षी शाहू जयंती निबंध-काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; पत्रकार राजन पारकर यांना प्रथम क्रमांक

मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या निबंध व काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेला राज्यभरातील शाहूप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

निबंध स्पर्धेत पत्रकार राजन पारकर (मुंबई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर काव्य स्पर्धेत अमित माने (कल्याण) यांना प्रथम क्रमांक आणि अमरसिंह जगदाळे (कोल्हापूर) यांना द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समाजात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

राजर्षी शाहू सलोखा मंच आणि राजर्षी शाहू स्तंभ स्मृती समिती, मुंबई यांच्या वतीने वर्षभर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असून, शासनाच्या सहकार्याने आयआयटीच्या विद्यार्थ्यांपासून महापालिका शाळांपर्यंत निबंध स्पर्धा पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव ६ मे २०२७ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ वी गल्ली, खेतवाडी, गिरगाव (मुंबई) येथील शाहू महाराजांच्या स्मृतीस्तंभ परिसरात करण्यात येणार आहे. याच ठिकाणी पूर्वी शाहू महाराजांचा राजवाडा होता आणि त्यांचे निधनही येथेच झाले होते. सध्या राजवाडा अस्तित्वात नसला तरी मुंबईत राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी शाहूप्रेमींची मागणी असून त्यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती समितीच्या समन्वयक प्रज्ञा जाधव यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पशुसंवर्धन विभागाच्या बदली प्रक्रियेवर गंभीर प्रश्न; शंभरहुन अधिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘मॅट’ मध्ये धाव

मुंबई( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-१ यांच्या…

24 मिनिटे ago

वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांची वडेट्टीवारांकडून भेट; हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पद्मापूर चक जंगलालगत रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या बल्लारपूर येथील आनंद दिवटे या…

27 मिनिटे ago

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची निवड पूर्णपणे वैध; नोटीसमध्ये तथ्य नाही; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार, कायद्यानुसार आणि नियमानुसारच झाल्याचा ठाम दावा…

31 मिनिटे ago

शासकीय कर्जाच्या आमिषाने शिरूरमध्ये १०० हून अधिक नागरिकांची लाखोंची कथित फसवणूक

महिला-बालकल्याण विभागाच्या नावाने पैसे उकळल्याचा आरोप; शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष शिरूर (अरुणकुमार…

38 मिनिटे ago

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ…

1 तास ago

दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना…

1 तास ago