मुंबई: मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सर्जनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेच्या बळावर मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सक्षमपणे उभी करत त्यांनी मराठी नाट्यविश्व अधिक समृद्ध केले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, शिस्त आणि कलात्मकतेचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळत असे.
पुढे त्या म्हणाल्या की, विजया मेहता यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमी, कलासाधना आणि नव्या पिढीतील कलाकार घडविण्यासाठी समर्पित होते. त्यांचे कार्य, विचार आणि कलात्मक योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI आक्रमक झाली असून, आज विधानभवन…
मुंबई: महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा (Oral Healthcare) क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य…
मुंबई: नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल शिवसेना…
मुंबई: परवडणारी घरे, दर्जेदार मूलभूत सुविधा आणि आधुनिक दळणवळण व्यवस्था या तीन प्रमुख बाबींवर भर…
मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेल्या खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या वाढत्या घटनांवरून…
मुंबई: अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मुंबईत निघालेल्या मोठ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय…