मुंबई: मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच भारतीय रंगभूमीने एक मनस्वी कलावंत गमावला असून, त्यांच्या जाण्याने एका समृद्ध सांस्कृतिक पर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सुनेत्रा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, विजया मेहता यांनी आपल्या विलक्षण दिग्दर्शनशैली, सर्जनशील दृष्टी आणि रंगकलेप्रती असलेल्या अखंड निष्ठेच्या बळावर मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सक्षमपणे उभी करत त्यांनी मराठी नाट्यविश्व अधिक समृद्ध केले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आशय, शिस्त आणि कलात्मकतेचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळत असे.
पुढे त्या म्हणाल्या की, विजया मेहता यांचे संपूर्ण आयुष्य रंगभूमी, कलासाधना आणि नव्या पिढीतील कलाकार घडविण्यासाठी समर्पित होते. त्यांचे कार्य, विचार आणि कलात्मक योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.विजया मेहता यांच्या निधनाने मराठी रंगभूमीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…