महाराष्ट्र

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत असून, या विकासाच्या प्रवासात सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ९६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ७११ कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार असून, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने १,४५९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ लाख २२ हजार ३६२ बाधित शेतकऱ्यांना ६३४ कोटी रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या’ अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२५-२६ मध्ये प्राप्त झालेल्या सुमारे ६ लाख ८८ हजार अर्जांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक अर्ज वेळेत निकाली काढण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी चालना देण्यासाठी ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान राज्यात जलसंधारण सप्ताह राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प करूया, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पाटोदा तालुक्यातील जरेवाडी जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जरेवाडीच्या आदर्श शाळेचे कौतुक केले होते. याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करण्याचा मानस सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

19 मिनिटे ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

47 मिनिटे ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

50 मिनिटे ago

शरीरात हे ५ संकेत दिसणं म्हणजे नक्कीच काहीतरी तंत्र बिघडलंय, दुर्लक्ष कराल तर होईल मोठं नुकसान

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…

54 मिनिटे ago

कॉलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात रोजच्या खाण्यातले हे पदार्थ; चांगल्या तब्येतीसाठी आजपासूनच खाणं सोडा

कोलेस्टेरॉल (Cholesterol) हा एक असा पदार्थ आहे, जो शरीरासाठी चांगला आणि वाईट दोन्ही आहे. यामुळेच…

58 मिनिटे ago

दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; नगराध्यक्षा, १९ नगरसेवकांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी…

1 तास ago