अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना चटका लागतो किंवा त्वचा भाजते. ही एक कॉमन बाब आहे. कारण असं अनेकदा महिलांसोबत होतं. अशात बऱ्याच महिला भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट लावतात. अनेकजण हा उपाय करतात. पण खरंच असं करणं बरोबर असतं का.
किती योग्य आहे हा उपाय
टूथपेस्ट लावल्यावर थोडावेळ थंड वाटतं. पण त्यातील केमिकल्स त्वचेचं अधिक नुकसान करू शकतात. त्यामुळे भाजलेल्या जागेवर इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्याशिवाय स्किन इरिटेशन होऊ शकते आणि अनेकदा तर त्या जागेवर चट्टा येतो. जो कधीही जात नाही. त्यामुळे टूथपेस्ट लावू नका.
मग काय करावं, काय नाही
थंड पाण्यानं धुवा
जर त्वचा भाजली असेल तर सगळ्यात आधी 10 ते 15 मिनिटं थंड पाण्यानं साफ करा. यामुळे जळजळ कमी होईल आणि त्वचेला आराम मिळेल.
बर्फ नका लावू
अनेक लोक असेही आहेत जे त्वचा भाजल्यावर त्यावर बर्फ लावतात. पण असं करणं योग्य नाही. बर्फाने भाजलेल्या त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं.
काहीच लावू नका
त्वचा जर भाजली असेल तर तेल, तूप किंवा इतर काहीही लावू नका. यामुळे त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे थंड पाण्यानं त्वचा धुणं हा पहिला बेस्ट उपाय आहे.
स्वच्छ कापडानं झाका
जळालेली जागा थंड पाण्यानं धुतल्यावर स्वच्छ कापडानं झाका. जेणेकरून त्यावर धूळ, माती लागू नये. जर जास्तच भाजलं असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांना दाखवा.
(सोशल मीडियावरून साभार)
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…
तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि…