पुणे: काव्यमित्र संस्थेच्या वतीने जाणारा राष्ट्रीय युवा चेतना हा पुरस्कार पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना नुकताच प्रदान केला गेला. काव्य मित्र संस्था गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी यंदाच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम ठेवत काही दिवसांपूर्वी पुरस्कार घोषणा केली होती. युवा चेतना पुरस्कारासोबतच आदर्श माता व राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार सुद्धा यावेळी प्रदान करण्यात आले.
सिद्धेश हे नॅशनल हिंदी न्यूज चॅनेल खबर फास्टला पुण्याचे ब्युरो चीफ म्हणून काम पाहत असून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाने लोंकांच्या हृदयात स्थान केले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीशी जवळीक ठेवून असणारे सिद्धेश यांचे ह्या सामाजिक पुरस्कारामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राजेंद्र सगर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अँकर स्वाती गोडसे यांनी केले.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…