pandurang-ulpe-kolhapur
कोल्हापूर: कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवासी पांडुरंग ऊर्फ तात्या उलपे यांना रुग्णालयाने मृत घोषित केले. अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक, मित्रपरिवार जमा झाले होते. सर्व जण रुग्णवाहिकेची वाट पाहत होते, पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्यांची हालचाल सुरू झाली.
कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी ही घटना घडली आहे. वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उलपे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला. त्याच वेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली. नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले. यानंतर तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आलेत. ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
पांडुरंग उलपे यांनी नातवांच्या, शेजाऱ्यांच्या आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे मला जीवनदान मिळाल्याचे सांगतात. पांडुरंग उलपे हे कोल्हापुरातील कसबा बावडा येथे राहत असून त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या काही दिवसात ते विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन देवाला अभिषेक घालणार असल्याचे त्यांच्या पत्नीने यावेळी सांगितले.
दरम्यान, पांडुरंग उलपे यांच्यावर रुग्णालयात १५ दिवस उपचार केल्यानंतर आज अशा घटनेनं ते घरी परतले. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना कोल्हापूरमध्ये घडल्यान देवांनी त्यांना परत पाठवले, अशी चर्चा कोल्हापुरात सुरू आहे.
हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी
Video : निघोज येथील रांजण खळगे एक निसर्गाचा चमत्कार!
Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…