मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलीय. मागील विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आहे, असं सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, ही योजना निवडणुकीपुरतीच होती आणि ती लवकरच बंद होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं.
‘लाडकी बहीण योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहे, असं ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो आहोत, ‘बहिणीला सक्षम करणे, हा आपला संकल्प आहे, असेही ते म्हणाले. अनेक लोकांना वाटायचं की निवडणुकीपुरतंच हे भाऊ पैसे देणार आहेत. पण आपण निवडणुकीनंतर ही योजना सुरू ठेवली. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. योग्य वेळी या निधीमध्ये वाढ होणार हे ही आम्ही सांगतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…