ठाणे : सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावातील ८ वर्षीय विराट भोसलेच्या मदतीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde धावून आले आहेत. जन्मतः नाक आणि घशात गाठ असलेल्या विराटवर ठाण्यात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुनावळे गावातील विराटच्या नाकात आणि घशात जन्मापासूनच गाठ होती. वय वाढत गेले तसे या गाठींचा आकारही वाढत गेला. त्यामुळे रात्री झोपताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. साताऱ्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियाच एकमेव उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. विराटचे वडील विष्णू भोसले आणि आई मनीषा भोसले यांना हा खर्च परवडणारा नव्हता.
दरम्यान, शिंदे दरे गावात विश्रांतीसाठी गेलेल्या भोसले कुटुंबीयांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. हा आजार काहीसा वेगळा असल्याने सरकारी योजनांमधून मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थिती समजताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ ठाण्यातील Siddhivinayak Hospital येथील डॉ. अमोल गित्ते यांच्याशी संपर्क साधून विराटवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर विराटला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉ. कौस्तुभ मेहता यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू ठेवल्यानंतर अखेर विराटला घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी विराटचे वडील विष्णू भोसले यांनी रुग्णालयाचे संचालक डॉ. अमोल गित्ते, डॉ. कौस्तुभ मेहता आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले. तसेच आपल्या मुलाच्या मदतीला तत्काळ धावून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही भोसले कुटुंबीयांनी मनापासून आभार व्यक्त केले.
अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला नेहमीच पुढे असणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळीही संवेदनशीलतेचा प्रत्यय देत लहानग्या विराटच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले.
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…