महाराष्ट्र

लोकसभेत ‘हल्ल्याचा प्लॅन’ वाद: मोदींसह आणखी एक खासदार टार्गेटवर असल्याचा पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण दिले आहे.

पंतप्रधान मोदींशिवाय काँग्रेसच्या महिला खासदारांच्या टार्गेटवर आणखी एक खासदार होता. “मी स्वतः त्या वेळी लोकसभेत उपस्थित होतो. परिस्थिती अत्यंत भीतीदायक होती. काही विरोधी खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला चारही बाजूंनी घेरले होते. काय घडू शकते, याचा अंदाज येत नव्हता,” असे गोयल म्हणाले.

मोदींचे भाषण रद्द का झाले?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भाषण होणार होते. मात्र कथित हल्ल्याच्या प्लॅनची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधानांना लोकसभेत येऊ नये, असा सल्ला देण्यात आल्याचे ओम बिर्ला यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण न होता आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कोण होते निशाण्यावर?

न्यूज १८ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या महिला खासदारांच्या निशाण्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे होते. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही महिला खासदार अध्यक्षांसमोरील जागेत जमल्या आणि नंतर पंतप्रधानांच्या आसनाकडे गेल्या. यावेळी त्यांची नजर निशिकांत दुबे यांच्यावर पडताच त्या त्यांच्या दिशेने जाऊ लागल्याचे सांगितले जाते.

याच क्षणी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी दुबे यांना इशारा करत सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. काही सेकंद दोघांमध्ये संवाद झाल्याचेही दिसून आले, अशी माहिती आहे.

वादाचे मूळ काय?

निशिकांत दुबे यांनी यापूर्वी लोकसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी संबंधित काही पुस्तकांचे संदर्भ देत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. यावरून काँग्रेस खासदारांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळेच दुबे हे महिला खासदारांच्या रोषाचे लक्ष्य ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेसचा आरोप फेटाळला

दरम्यान, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिला खासदार केवळ बॅनर दाखवून शांततामय विरोध करत होत्या. कोणताही हल्ल्याचा प्लॅन नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

5 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

5 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

5 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

6 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

6 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

6 तास ago