‘महाराजस्व समाधान शिबीर’ लोकाभिमुख उपक्रम
मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहावे शिबिर अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंगलप्रभात लोढा, हारून खान, विक्रांत पाटील तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित होते.
बावनकुळे यांनी महसूल विभागाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना सांगितले की, अकृषक कायद्यातील सुधारणा, तुकडेबंदी कायदा रद्द करणे, व्हर्टिकल सातबारा, मोजणीनंतर नोंदणी व म्युटेशन प्रक्रिया आणि लँड टायटलिंगमुळे नागरिकांचे अनेक वर्षांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक व वादमुक्त होतील, असेही त्यांनी नमूद केले.
मंगलप्रभात लोढा यांनी महसूल विभागाच्या उपक्रमांचे कौतुक करताना, प्रत्येक तालुक्यात होत असलेल्या महाराजस्व समाधान शिबिरांमुळे नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळत असल्याचे सांगितले. तसेच उपनगर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या शर्तभंग झालेल्या जमिनी पुन्हा शासनाच्या ताब्यात आणल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे विशेष कौतुक केले.
शिबिरामध्ये नागरिकांना अधिवास, उत्पन्न, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सातबारा उतारे, फेरफार, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना कार्ड, निवडणूक उतारे, तृतीयपंथी कार्ड, बचतगट प्रमाणपत्रे तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सदनिकांचे वितरण करण्यात आले.
मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी…
मुंबई: राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या…
मुंबई: दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७…
मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले…
बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर…
मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज…