महाराष्ट्र

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार Satyajeet Tambe यांनी दिली. शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित या बैठकीत आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासनाच्या विविध आदेशांमुळे निर्माण झालेल्या समस्या, निधी वितरणातील अडथळे, आवश्यक सुविधांचा अभाव आणि दैनंदिन कामकाजातील अडचणी यावर संस्थाचालकांनी आपली मते मांडली.

यावेळी आमदार तांबे यांनी संस्थाचालकांच्या समस्या ऐकून घेत या सर्व प्रश्नांना येत्या पावसाळी अधिवेशनात शासनासमोर ठामपणे मांडण्याचे आश्वासन दिले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आश्रमशाळांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीस माजी खासदार Bapu Chaure, शिवराम झोले, पोपटराव सोनवणे, युवराज पाटील, राजेंद्र सरोदे, तुषार रंधे, डॉ. शशिकांत वाणी यांच्यासह नाशिक विभागातील विविध संस्था प्रमुख आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत आश्रमशाळांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र…

8 तास ago

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महायुतीवर निशाणा

मुंबई: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर…

8 तास ago

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

8 तास ago

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात…

8 तास ago

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात…

8 तास ago

टाकळी हाजी येथे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह तीन चोरटे रंगेहाथ जेरबंद

शिरूर (सुनिल जिते): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या…

8 तास ago