नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका
दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक व इतर कचरा उघड्या जागेत पेटवून दिला. प्लास्टिक जळाल्याने परिसरात काही काळ दाट धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना अशा धुराचा अधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढून मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच मातीची सुपीकता कमी होणे, झाडे-वनस्पतींना हानी पोहोचणे आणि जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उघड्यावर प्लास्टिक जाळण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.“पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई व्हावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…