मुख्य बातम्या

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका

दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात एका इसमाने कंपनीमधील काळ्या प्लास्टिकचा साठा उघड्यावर जाळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने कंपनीतील वापरात असलेले काळे प्लास्टिक व इतर कचरा उघड्या जागेत पेटवून दिला. प्लास्टिक जळाल्याने परिसरात काही काळ दाट धुराचे साम्राज्य पसरले होते. या धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना अशा धुराचा अधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक जाळल्याने हवेत विषारी वायू मिसळतात. त्यामुळे वायू प्रदूषण वाढून मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच मातीची सुपीकता कमी होणे, झाडे-वनस्पतींना हानी पोहोचणे आणि जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उघड्यावर प्लास्टिक जाळण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.या प्रकरणाची संबंधित प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.“पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई व्हावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा…

8 तास ago

NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र…

8 तास ago

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महायुतीवर निशाणा

मुंबई: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर…

8 तास ago

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

8 तास ago

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात…

8 तास ago

टाकळी हाजी येथे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला; दुचाकीसह तीन चोरटे रंगेहाथ जेरबंद

शिरूर (सुनिल जिते): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सोदकवस्ती परिसरातील डाळिंबाच्या बागेत चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या…

8 तास ago