महाराष्ट्र

MPSC प्रश्नांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे; सतेज पाटील यांचे विधान परिषद सभापतींना पत्र

मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.

सतेज पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संबंधित परीक्षा, भरती प्रक्रिया, पेपरफुटी, रिक्त पदे आणि भरतीतील विलंब या मुद्द्यांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या गंभीर प्रश्नांवर केवळ औपचारिक नव्हे, तर स्पष्ट, जबाबदार आणि तथ्याधारित उत्तरे देणे सरकारचे कर्तव्य आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळालाच पाहिजे. लोकशाहीतील उत्तरदायित्व कायम राखण्यासाठी सरकारने या मागणीची तातडीने दखल घेऊन सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडावी, अशी मागणीही सतेज पाटील यांनी आपल्या पत्रातून केलीआहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

24 मिनिटे ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

27 मिनिटे ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

33 मिनिटे ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

36 मिनिटे ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

39 मिनिटे ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

49 मिनिटे ago