महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सातबारा कोरा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, महागाई वाढली आहे आणि शेती करणे परवडेनासे झाले आहे. शेती आणि शेतकरी दोघेही संकटात असताना सरकार मात्र निष्क्रिय आहे. लाडक्या बहिणींसह अन्नदात्यांचाही विश्वासघात करण्यात आला असून, जाहीर केलेली कर्जमाफी लाखो शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार नाही. सरकारला जाग येईपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरही सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत ७७ वेळा पेपरफुटी झाल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार ‘व्यापम’पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचे म्हटले. सरकारची यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून विद्यार्थी आणि पालकांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन सुरू केले असून, या लढ्याला काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील, असेही सपकाळ यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

1 तास ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

1 तास ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

1 तास ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

1 तास ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

2 तास ago

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या…

2 तास ago