महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेचा कोटींचा अर्थसंकल्प तरीही हाती सत्ता नाही, पण खर्चाला उधळपट्टी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सध्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकीय ताब्यात आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेचा तब्बल ₹74,427 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला. पण हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून, मुंबईकरांच्या विकासापेक्षा सत्ताधारी भाजपच्या आगामी निवडणुकीच्या गणिताचा भाग वाटतो.

हे एकहाती निर्णय की मुंबईकरांच्या भावनांवर घाला

मुंबई महानगरपालिकेवर लोकशाही नसून प्रशासकीय राजवट आहे. याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षाने आपल्या मर्जीतील प्रकल्पांसाठी वाट्टेल तसे खर्च मांडले आहेत. मुंबईकरांच्या गरजा, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अपेक्षा आणि जनतेच्या मतांची कुठलीही जाणीव न ठेवता घेतलेले हे निर्णय म्हणजे “एक हाती सत्ता, मनमानी खर्चाची परवानी.

महापालिकेचा खिसा रिकामा, पण भ्रष्टाचाराला पूर

भ्रष्टाचाराचा अखंड स्त्रोत असलेल्या भाजपच्या कारभारात, हा अर्थसंकल्प म्हणजे “अंधारात कंदिल विकण्याचा उद्योग!” आहे. मागील वर्षांपासून मुंबईत विकासकामे रेंगाळली आहेत, रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, घनकचरा व्यवस्थापनातील अपयश, सार्वजनिक आरोग्य सेवांचे हाल – याकडे लक्ष न देता शुद्ध PR आणि जाहिरातींवर कोट्यवधींचा चुराडा केला जात आहे.

कोणाच्या खिशात जातायत हे हजारो कोटी?कोट्यवधींची विकासकामे जाहीर केली, पण त्यांची अंमलबजावणी कुठे

कंत्राटदार आणि दलालांना बिनधास्त सुट दिली, पण लोकांसाठी मूलभूत सुविधा नाहीत.एकाच कंत्राटदारांना वारंवार कामे देण्यामागे कोणाचा आर्थिक स्वार्थ? आयुक्त म्हणजे सरकारी निमित्त, पण अर्थसंकल्पाची सूत्रे दिल्लीतूनच हलवली जातायत का?

शिलकीचा हिशोब दाखवा, नाही तर हिशोब द्या

मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटींची शिल्लक असतानाही, मुंबईकरांवर नवे कर लादायचे आणि विकासकामांचे श्रेय मात्र सत्ताधाऱ्यांनी घ्यायचे – हा डाव फसवणुकीचा आहे. जनता मूर्ख नाही, आणि आगामी निवडणुकीत हाच पैसा “ईडी-मनी टू इलेक्शन फंड” होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मुंबईकरांच्या पैशावर दिल्लीत सत्ता माजवणाऱ्यांचा हिशोब लागणारच

ॲड. अमोल मातेले

प्रदेशप्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

19 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

19 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

19 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

21 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago