महाराष्ट्र

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! ‘राष्ट्रवादी’ने मराठ्यांचा फक्त वापर केला

मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला.

शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असं पवार म्हणालेले. त्यानंतर अनेक स्तरांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोळंकेंना मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती, त्यावर ते बोलले.

काय म्हणाले प्रकाश सोळंके

”मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय. मी पाचवी टर्म आमदार आहे, अनुभवी आहे, मला पक्षाचा (राष्ट्रवादी काँग्रेस) ३५ वर्षांचा इतिहास माहिती आहे. पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसींसाठी राखीव असावा, असं वाटतंय. इथे बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही, असं पक्षाने ठरवल्याचं दिसंतय.”

सोळंके पुढे म्हणाले, पक्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मागील अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. परंतु मंत्रिपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते. शरद पवारांनीही तेच केलं आणि अजित पवारही तेच करत आहेत. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.. हे माझे अनुभवाचे बोलत आहेत. अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांवर सोळंके म्हणाले, अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत हे मला माहिती नाही. परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, माझ्या शेजारचा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो.

धनंजय मुंडेंना मिळलेल्या क्लिनचीटवर सोळंके म्हणाले, त्याबाबतीत माझे जे काही मत आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. महादेव मुंडे प्रकरणावर सोळंके म्हणाले, खून प्रकरणात नवनवीन माहिती पुढे येत आहे. २० महिने झाले तरी आरोपी निष्पन्न होत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल करणं गरेजचं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago