मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला.
शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केलं होतं. त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असं पवार म्हणालेले. त्यानंतर अनेक स्तरांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोळंकेंना मंत्रिपद मिळण्याविषयी चर्चा होत होती, त्यावर ते बोलले.
काय म्हणाले प्रकाश सोळंके
”मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय. मी पाचवी टर्म आमदार आहे, अनुभवी आहे, मला पक्षाचा (राष्ट्रवादी काँग्रेस) ३५ वर्षांचा इतिहास माहिती आहे. पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने बीड जिल्हा हा ओबीसींसाठी राखीव असावा, असं वाटतंय. इथे बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही, असं पक्षाने ठरवल्याचं दिसंतय.”
सोळंके पुढे म्हणाले, पक्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मागील अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठिंबा दिलेला आहे. परंतु मंत्रिपद देताना मात्र कायम ओबीसींना आणि इतरांना संधी दिली जाते. शरद पवारांनीही तेच केलं आणि अजित पवारही तेच करत आहेत. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.. हे माझे अनुभवाचे बोलत आहेत. अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.
धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांवर सोळंके म्हणाले, अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत हे मला माहिती नाही. परंतु ते आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, माझ्या शेजारचा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो.
धनंजय मुंडेंना मिळलेल्या क्लिनचीटवर सोळंके म्हणाले, त्याबाबतीत माझे जे काही मत आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. महादेव मुंडे प्रकरणावर सोळंके म्हणाले, खून प्रकरणात नवनवीन माहिती पुढे येत आहे. २० महिने झाले तरी आरोपी निष्पन्न होत नाहीत. अजूनही वेळ गेलेली नाही. नवीन माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हे दाखल करणं गरेजचं आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…