महाराष्ट्र

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान आणि फैजल खलील शेख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वावर व काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला असल्याचे त्यांनी नमूद केले.काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

30 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago