महाराष्ट्र

NEET 2026 पुनर्परीक्षा निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”

मुंबई: NEET 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी पुनर्परीक्षेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकार आणि NTA वर जोरदार टीका केली आहे.

देशातील तब्बल २२ लाख ७९ हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळ करत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले, त्या केंद्रांवरच पुनर्परीक्षा घेणे अपेक्षित होते. मात्र संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांवर पुनर्परीक्षेचा बोजा टाकून सरकार स्वतःच्या निष्काळजीपणावर पडदा टाकत आहे.

“सरकारच्या व्यवस्थेमुळे पेपर फुटला, मग विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा का द्यावी?” असा सवाल उपस्थित करत मातेले यांनी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक ताणाचा मुद्दा उपस्थित केला. वर्षानुवर्षे मेहनत घेणारे विद्यार्थी, कर्ज काढून क्लासेस लावणारे पालक आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच स्पर्धेत ढकलणे अमानुष असल्याचे त्यांनी म्हटले.

“डिजिटल इंडियाच्या घोषणा करणारे सरकार एक संवेदनशील परीक्षा सुरक्षित घेऊ शकत नाही, ही गंभीर बाब आहे. विद्यार्थी हे सरकारच्या अपयशावर झाकण ठेवण्यासाठी वापरायचे प्रयोगातील प्राणी नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.

NTA ही संस्था विद्यार्थ्यांचा विश्वास गमावल्याचा आरोप करत तिला तात्काळ बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

2 तास ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

2 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

15 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

16 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

16 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

16 तास ago