महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट, नाकर्त्या व निष्क्रिय कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसूड

मुंबई पावसाळा सुरू होताच दरवर्षी पाण्यात बुडते, रस्ते खड्ड्यांनी पोखरले जातात, वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही तेच वास्तव सायन-माटुंगा, वडाळा चार रस्ता, चेंबूर, दादर, भायखळा यांसारख्या ठिकाणी दिसून आले.

आज या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहितदादा पवार, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी ठिकठिकाणी पाहणी करून थेट नागरिकांशी संवाद साधला. पाहणीतून उघड झाले की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण आहे.

महानगरपालिकेविरोधातील रोखठोक टीका नालेसफाई घोटाळा; ५०० कोटींचा सवाल

दरवर्षी नालेसफाईसाठी शेकडो कोटी खर्च दाखवले जातात, परंतु प्रत्यक्षात नाले गाळाने भरलेले व अडथळ्यांनी तुडुंब आहेत. पावसाचे पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावर साचून तलाव निर्माण करतात. “हे पैसे कुठे गेले?” हा थेट सवाल आज रोहितदादा पवारांनी उपस्थित केला. रस्त्यांवरील खड्डे – मृत्यूचे सापळे मुंबईतील बहुतेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. तरीही बीएमसी आणि सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुकीच्या जाहिरातींवर पैसा खर्च करत आहेत.पोलिस स्टेशनही पाण्यात शासनाचा निष्काळजीपणा सायन-माटुंगा पोलिस स्टेशन परिसर पाण्याखाली गेला. पोलिसांसारख्या महत्वाच्या यंत्रणेलाच पाण्याचा फटका बसत असेल तर सामान्य नागरिकांचे किती हाल होत असतील, याची कल्पनाही करवत नाही.

मुंबईकरांच्या पैशाचा गैरवापर 

मुंबईकर प्रचंड मालमत्ता कर, टोल व अन्य कर भरतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना मिळते – तुंबलेले रस्ते, खड्ड्यांचा महापूर, पाणी साचून झालेल्या साथीचे आजार आणि जीवघेणे अपघात. हा नागरिकांवरील सरळसरळ अन्याय आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी नालेसफाईसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची सखोल चौकशी व्हावी. जबाबदार अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी. नागरिकांना दिलेले कर परत पायाभूत सुविधा सुधारण्यावर खर्च व्हावेत. मुंबईला “तुंबई” बनवणाऱ्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांचा भांडाफोड करून रस्त्यावरून लढा उभारला जाईल.

आमदार रोहितदादा पवार यांचे स्पष्ट शब्दात विधान

मुंबईकर दरवर्षी कर भरूनही पाण्यात बुडत आहेत. ५०० कोटींची नालेसफाई कुठे झाली, याचा हिशोब द्यावा. अन्यथा आम्ही हा मुद्दा रस्त्यावरून आणि विधानसभेतून उचलून धरू. युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांचा इशारा “मुंबईच्या तरुणांचा संयम संपत चालला आहे. करांच्या बदल्यात सेवा न देता फक्त भ्रष्टाचार केल्यास आम्ही युवक रस्त्यावर उतरून थेट उत्तर मागू!”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा आज जगासमोर हसे होत आहे. आता नागरिकांचा संयम संपला आहे. मुंबईकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघर्ष अधिक आक्रमक पद्धतीने उभारला जाईल.

ॲड अमोल मातेले 

मुंबई अध्यक्ष,

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

60 मिनिटे ago

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

15 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

16 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

17 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

18 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

19 तास ago