महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट, नाकर्त्या व निष्क्रिय कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसूड

मुंबई पावसाळा सुरू होताच दरवर्षी पाण्यात बुडते, रस्ते खड्ड्यांनी पोखरले जातात, वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही तेच वास्तव सायन-माटुंगा, वडाळा चार रस्ता, चेंबूर, दादर, भायखळा यांसारख्या ठिकाणी दिसून आले.

आज या सर्व परिस्थितीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहितदादा पवार, मुंबई अध्यक्षा राखी जाधव आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी ठिकठिकाणी पाहणी करून थेट नागरिकांशी संवाद साधला. पाहणीतून उघड झाले की मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि नाकर्तेपणाचे जिवंत उदाहरण आहे.

महानगरपालिकेविरोधातील रोखठोक टीका नालेसफाई घोटाळा; ५०० कोटींचा सवाल

दरवर्षी नालेसफाईसाठी शेकडो कोटी खर्च दाखवले जातात, परंतु प्रत्यक्षात नाले गाळाने भरलेले व अडथळ्यांनी तुडुंब आहेत. पावसाचे पाणी वाहण्याऐवजी रस्त्यावर साचून तलाव निर्माण करतात. “हे पैसे कुठे गेले?” हा थेट सवाल आज रोहितदादा पवारांनी उपस्थित केला. रस्त्यांवरील खड्डे – मृत्यूचे सापळे मुंबईतील बहुतेक रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. तरीही बीएमसी आणि सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुकीच्या जाहिरातींवर पैसा खर्च करत आहेत.पोलिस स्टेशनही पाण्यात शासनाचा निष्काळजीपणा सायन-माटुंगा पोलिस स्टेशन परिसर पाण्याखाली गेला. पोलिसांसारख्या महत्वाच्या यंत्रणेलाच पाण्याचा फटका बसत असेल तर सामान्य नागरिकांचे किती हाल होत असतील, याची कल्पनाही करवत नाही.

मुंबईकरांच्या पैशाचा गैरवापर 

मुंबईकर प्रचंड मालमत्ता कर, टोल व अन्य कर भरतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना मिळते – तुंबलेले रस्ते, खड्ड्यांचा महापूर, पाणी साचून झालेल्या साथीचे आजार आणि जीवघेणे अपघात. हा नागरिकांवरील सरळसरळ अन्याय आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी नालेसफाईसाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची सखोल चौकशी व्हावी. जबाबदार अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी. नागरिकांना दिलेले कर परत पायाभूत सुविधा सुधारण्यावर खर्च व्हावेत. मुंबईला “तुंबई” बनवणाऱ्या निष्क्रिय सत्ताधाऱ्यांचा भांडाफोड करून रस्त्यावरून लढा उभारला जाईल.

आमदार रोहितदादा पवार यांचे स्पष्ट शब्दात विधान

मुंबईकर दरवर्षी कर भरूनही पाण्यात बुडत आहेत. ५०० कोटींची नालेसफाई कुठे झाली, याचा हिशोब द्यावा. अन्यथा आम्ही हा मुद्दा रस्त्यावरून आणि विधानसभेतून उचलून धरू. युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांचा इशारा “मुंबईच्या तरुणांचा संयम संपत चालला आहे. करांच्या बदल्यात सेवा न देता फक्त भ्रष्टाचार केल्यास आम्ही युवक रस्त्यावर उतरून थेट उत्तर मागू!”

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा आज जगासमोर हसे होत आहे. आता नागरिकांचा संयम संपला आहे. मुंबईकरांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संघर्ष अधिक आक्रमक पद्धतीने उभारला जाईल.

ॲड अमोल मातेले 

मुंबई अध्यक्ष,

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

4 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

7 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

7 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

7 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

9 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

9 तास ago