महाराष्ट्र

परिणय फुके यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार प्रतिउत्तर

मुंबई: भाजपचे आमदार परिणय फुके यांनी राज ठाकरे यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे “चोराच्या उलट्या बोंबा” असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. ज्यांच्या पक्षावर सातत्याने पक्षफोडीचे आरोप झाले, त्यांनी इतरांना फोडाफोडीचे धडे देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

ॲड. मातेले म्हणाले की, राज ठाकरे यांनी कधी इतर पक्षांचे आमदार, खासदार किंवा कार्यकर्ते फोडून स्वतःचे राजकारण उभे केले का, याचे उत्तर भाजपने आधी जनतेला द्यावे. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी आपल्या पक्षात घेऊन सरकारे स्थापन करण्याच्या घटना घडल्या असून, फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक ठसा भाजपवरच उमटल्याचे त्यांनी नमूद केले.

जनतेने एका पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेच्या समीकरणासाठी आपल्या गोटात घेऊन सरकारे स्थापन करणे आणि त्यालाच नैतिकतेचा मुलामा देणे, ही राजकीय संस्कृती महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपला बहुतेक दुसऱ्यांच्या पक्षातील नेत्यांनाच अधिक महत्त्व देण्याची सवय लागली असून, स्वतःच्या कार्यकर्त्यांपेक्षा आयात केलेल्या नेत्यांवर त्यांचा अधिक विश्वास असल्याचे चित्र दिसते, असा टोला त्यांनी लगावला.

दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी भाजपने स्वतःच्या राजकीय भूमिकेचा आरसा पाहावा. महाराष्ट्रातील सुजाण जनता सर्व काही पाहत असून योग्य वेळी त्याचा राजकीय हिशेब करेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…

8 तास ago

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…

8 तास ago

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…

8 तास ago

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

8 तास ago

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, तटकरेंचा नवा डाव?

मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…

8 तास ago

मृत्यूनंतर कोणता अवयव किती वेळ जिवंत असतो? यावेळी शरीरात नेमके कोणते बदल होतात

जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…

9 तास ago