मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या योजना आणि प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती त्यांना दिली आणि केंद्र सरकारशी समन्वयातून राबविल्या जात असलेल्या योजना, प्रकल्पांबाबत सहकार्यही मागितले,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांची भेट नेहमीच नवी ऊर्जा देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याची राजकीय पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा विरोधकांकडून यापूर्वी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांनाही गेल्या काही दिवसांत वेग आला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीएच्या महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने महायुतीतील संबंधांबाबतच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्याही बारकाईने पाहिले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नेमकी कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फडणवीस यांनी मात्र ही भेट महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या तरी केंद्रीय जबाबदारी किंवा राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना आणखी वेग आला असून, आगामी काळात या भेटीचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…
मुंबई : अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. रायगडच्या…
जन्माबरोबर प्रत्येक माणसाचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह जाळला जातो किंवा त्यावर…
प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. काही जणांना कोरा चहा, काहींना दुधाचा…