पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे.
या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) ने या घटनेचा निषेध केला आहे. पक्षाचे वकील अनिल घाटगे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत पुण्याच्या महापौर व उपमहापौरांचा निषेध करण्याचा ठराव मंजूर करून तो पुणे महानगरपालिकेला पाठवावा, अशी मागणी केली आहे.
अनिल घाटगे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सीमाभागातील हजार वस्तीच्या गावातही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारलेले आहेत. पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन प्रथम पुतळा बसवला आणि मेमोरियल उभारले. त्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा कोल्हापूर व बहुजन समाजाचा अपमान आहे.”
दरम्यान, या प्रकरणावर पुण्यात सर्वप्रथम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. महापौरांनी डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण केल्यानंतर शाहू महाराजांना केवळ नमस्कार केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या घटनेमुळे पुणे आणि कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसकडूनही टीका
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडूनही या घटनेवर टीका करण्यात आली आहे. शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर प्रकरणावर महापौरांकडून अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…