संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने 28 वर्षीय आयशा समीर मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधे घेतली. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. सुरुवातीला हा त्रास सामान्य असल्याचे समजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र रक्तस्राव न थांबल्याने त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे सुमारे दहा दिवस उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तब्बल 13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
डॉक्टरांचे काय म्हणणे?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताच्या गोळ्या केवळ ठरावीक कालावधीतील गर्भधारणेसाठी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच सुरक्षित असतात. चुकीचा कालावधी, अपुरी वैद्यकीय तपासणी किंवा चुकीचे डोस घेतल्यास अतिरक्तस्राव, संसर्ग, अपूर्ण गर्भपात आणि जीवघेणा शॉक यांसारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
ग्रामीण भागात सामाजिक दबाव, गोपनीयतेची भीती किंवा माहितीअभावी अनेक महिला थेट मेडिकलमधून औषधे खरेदी करतात. काही ठिकाणी बेकायदेशीर विक्री होत असल्याच्याही चर्चा आहेत.
कायदेशीर तरतुदी आणि जागरूकतेची गरज
भारतात कायद्याने ठरावीक अटींनुसार सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय औषधे घेणे जीवघेणे ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण भागातील आरोग्यजागरूकतेचा गंभीर प्रश्न अधोरेखित करणारी आहे.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…