मुंबई: केंद्रातील भारतीय जनता पार्टी (भाजप) सरकारच्या धोरणांविरोधात इंडियन नॅशनल काँग्रेस च्या वतीने आज सोलापूरात तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘देशद्रोही भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘राहुल गांधीजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा जोरदार घोषणा दिल्या.आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
भारत-अमेरिका व्यापार करारावर आक्षेप
भारत-अमेरिका व्यापार करार देशहिताचा नसून त्याचा थेट फटका शेतकरी, व्यापारी, कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. एकतर्फी सवलतींमुळे शेतमालाच्या किमती घसरत असून बाजारात अस्थिरता निर्माण होत असल्याचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले. हा करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
धमकी आणि हल्ल्याचा निषेध
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी तसेच पक्षाच्या खासदारांना भाजपशी संबंधित कार्यकर्त्याकडून घरात घुसून गोळ्या घालण्याची उघड धमकी दिल्याच्या घटनेचा आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच पुणे येथे प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचाही निषेध करण्यात आला. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून मुक्त विचार, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि संविधानिक मूल्यांवर केलेला थेट प्रहार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव राहुल वर्धा, श्रीशैल रणधीरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबूराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, पशुपती माशाळ, माजी नगरसेवक सिद्धाराम चाकोते, हारुण शेख, उपाध्यक्ष विश्वनाथ साबळे, राजन कामत, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, गिरीधर थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…