महाराष्ट्र

आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार अर्ज

औरंगाबाद: रब्बी हंगाम पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.

मोबाईलवरून अर्ज कसा करावा…

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप डाऊनलोड करायचे आहे. हे अँप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे. मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन होईल. पहिली विंडो ओपन होईल, यात PMFBY insurance नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर सर्वात प्रथम राज्य, हंगाम, योजेनचे नाव, योजनेचे वर्ष निवडायचे आहे. वरील पर्याय निवडल्यांनंतर सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करायच आहे. यानंतर बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. जसे की, बँकेचे नाव, खाते नंबर इत्यादी. यानंतर शेतकऱ्याची माहिती आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे भरायची आहे. यात नाव, पत्ता इत्यादी. पुढच्या विंडोमध्ये जिल्हा, तालुका, तहसील, गाव माहिती भरायची आहे. यानंतर पिकाची माहिती भरायची आहे. जसे की, पिकाचे नाव, लागवड तारीख, सर्व्हे नंबर, खाते नंबर, मालकी हक्क इत्यादी. हे सर्व भरल्यानंतर जर तुम्ही या आधी पीक विमा भरला असेल तर पूर्वीची माहिती दाखवली जाईल. ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. यानंतर कागदपत्रे उपलोड करणे बंधनकारक आहे. जसे की, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक आणि पीक पेरा प्रमाणपत्र. यानंतर पुढील विंडोमध्ये थेट पेमेंट करण्याचा पर्याय येईल. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये संपूर्ण माहिती भरल्याची पावती दिसेल. ती तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

2 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

9 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

9 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

9 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

9 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 तास ago