महाराष्ट्र

आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार अर्ज

औरंगाबाद: रब्बी हंगाम पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.

मोबाईलवरून अर्ज कसा करावा…

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप डाऊनलोड करायचे आहे. हे अँप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचे आहे. मोबाईल नंबर आलेला ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन होईल. पहिली विंडो ओपन होईल, यात PMFBY insurance नावाच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर सर्वात प्रथम राज्य, हंगाम, योजेनचे नाव, योजनेचे वर्ष निवडायचे आहे. वरील पर्याय निवडल्यांनंतर सेव्ह आणि सबमिटवर क्लिक करायच आहे. यानंतर बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. जसे की, बँकेचे नाव, खाते नंबर इत्यादी. यानंतर शेतकऱ्याची माहिती आधार कार्डवर असलेल्या नावाप्रमाणे भरायची आहे. यात नाव, पत्ता इत्यादी. पुढच्या विंडोमध्ये जिल्हा, तालुका, तहसील, गाव माहिती भरायची आहे. यानंतर पिकाची माहिती भरायची आहे. जसे की, पिकाचे नाव, लागवड तारीख, सर्व्हे नंबर, खाते नंबर, मालकी हक्क इत्यादी. हे सर्व भरल्यानंतर जर तुम्ही या आधी पीक विमा भरला असेल तर पूर्वीची माहिती दाखवली जाईल. ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. यानंतर कागदपत्रे उपलोड करणे बंधनकारक आहे. जसे की, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक आणि पीक पेरा प्रमाणपत्र. यानंतर पुढील विंडोमध्ये थेट पेमेंट करण्याचा पर्याय येईल. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर पुढील विंडोमध्ये संपूर्ण माहिती भरल्याची पावती दिसेल. ती तुम्हाला डाऊनलोड करता येईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

16 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

18 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

22 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

23 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

23 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

23 तास ago