महाराष्ट्र

शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बसेस; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५०% टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो.

अर्थात, यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात असल्या एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

मागील वर्षी शालेय सहलीसाठी १९६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या. मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपुर्ती रक्कमेसह ) महसूल प्राप्त झाला होता.

यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

12 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

12 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

16 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago