नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या!
“आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे.
एकनाथ शिंदे : गेम चेंजर आणि किंगमेकर
मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उदय हा केवळ सत्तेचा योगायोग नाही, तर तो मराठी मतदारांशी पुन्हा जोडले गेलेले नाते दर्शवतो. शिवसेनेतील एकेकाळचे दुसऱ्या फळीतील नेते आज मराठी माणसांचे नायक म्हणून पुढे आले आहेत.
लोकसभा, विधानसभा, पंचायत आणि आता महानगरपालिका — सलग चौथ्या निवडणुकीत शिंदे गटाची कामगिरी उंचावत गेली आहे. त्यामुळे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण?” यावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा सुरू आहे.
२९ महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडीवर असली, तरी एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपचा विजय अपूर्ण आहे, हे वास्तव आहे. मुंबई महापालिकेतही भाजप शिंदे गटाशिवाय महापौर बसवू शकत नाही, ही आजची राजकीय स्थिती आहे.
अमराठी नगरसेवकांचा वाढता प्रभाव : चिंतेचा विषय
या सगळ्या राजकारणात एक गंभीर प्रश्न समोर येतो. मुंबईत अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या आणि त्यांचा प्रभाव.
२०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत २२७ पैकी मोठ्या प्रमाणात अमराठी नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचेच ३३ नगरसेवक अमराठी असल्याचे चित्र आहे. याशिवाय काँग्रेस, शिवसेना (उबाठा), शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादीतही अमराठी प्रतिनिधित्व वाढले आहे.
या प्रतिनिधींनी निवडणुका विविध जातीय, धार्मिक व प्रादेशिक समीकरणांवर जिंकल्या असतील. पण ते मूळ मुंबईकरांचे हित जपतील का? हा प्रश्न आज सामान्य मराठी माणसाच्या मनात आहे.
मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी अस्तित्व
मराठी शाळा वाचवण्याचा प्रश्न गंभीर आहेच. त्यातच त्रिभाषा सूत्राअंतर्गत हिंदी सक्तीचा केलेला प्रयत्न लोकचळवळीमुळे थांबवावा लागला, हे लक्षात घ्यावे लागेल. मुंबई आणि महाराष्ट्रात परप्रांतीयांचे वाढते आक्रमण आणि ताकद दाखवण्याचे प्रयत्न यावर गाव ते शहर पातळीवर संघटित जागरुकता आवश्यक आहे.
महापौर पद आणि राजकीय घोषणा
भाजप : हिंदू महापौर
एमआयएम : बुरखाधारी महिला महापौर
शिवसेना (उबाठा)-मनसे : मराठी माणूस महापौर
प्रत्येक पक्ष आपापल्या राजकीय भूमिकेनुसार घोषणा देत आहे. मात्र या सगळ्यात मूळ मुंबईकर अस्वस्थ आहे, कारण मुंबईची जमीन, मोक्याच्या जागा आणि आर्थिक ताकद हळूहळू अमराठी धनदांडग्यांच्या हाती जात असल्याची भावना बळावत आहे.
शिवसेनेकडून अपेक्षा वाढल्या
शिवसेनेतील दुफळी काहीही असो, मुंबईच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने वेगाने आणि थेट मराठी माणसांशी संवाद साधत आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाही मुंबईकरांसाठी मोठा वाटा असायला हवा, असा कौल मराठी मतदारांनी दिला आहे.
निष्कर्ष
वाद थांबवा.
अहंकार बाजूला ठेवा.
मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या.
तेव्हा “आमची मुंबई, मराठी मुंबई” ही केवळ घोषणा न राहता लोकचळवळ बनेल.
आणि येऊ घातलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हीच समस्त मुंबईकरांची अपेक्षा आहे.
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…
पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…
1) आपण जेव्हा मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आपल्या पायांवर ताण येऊ ते दुखू लागतात. जर…
केसांच्या अनेक समस्यांमध्ये केसगळती व केस अकाली पांढरे होणे या दोन समस्या फारच कॉमन आहेत.…
डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची…