मुंबई: ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात मुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची ठाम बाजू घेतली आहे. इंदापूर दौऱ्यावर बोलताना भरणे यांनी स्पष्ट केलं की, “या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा कोणताही दोष नाही. त्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील. कोण चांगला आहे की भोंदू, हे प्रत्येकवेळी ओळखणं शक्य नसतं.”
भरणे पुढे म्हणाले, “कोणी आपल्याला कुठे बोलावलं आणि आपण गेलो, त्यावरून पुढे काही घडलं, तर त्यासाठी आपल्यालाच दोषी धरणं योग्य नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर दर्शन झालं किंवा फोटो काढला गेला, म्हणून त्यात चूक ठरवणं चुकीचं आहे.”
या पार्श्वभूमीवर, विरोधकांनी मात्र चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागलं असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…