महाराष्ट्र

भोंदूबाबा प्रकरणावरून राजकारण तापलं; रूपाली चाकणकर अडचणीत, दत्तात्रय भरणे यांची ठाम पाठराखण

मुंबई: ज्योतिष व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात मुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची ठाम बाजू घेतली आहे. इंदापूर दौऱ्यावर बोलताना भरणे यांनी स्पष्ट केलं की, “या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा कोणताही दोष नाही. त्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असतील. कोण चांगला आहे की भोंदू, हे प्रत्येकवेळी ओळखणं शक्य नसतं.”

भरणे पुढे म्हणाले, “कोणी आपल्याला कुठे बोलावलं आणि आपण गेलो, त्यावरून पुढे काही घडलं, तर त्यासाठी आपल्यालाच दोषी धरणं योग्य नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर दर्शन झालं किंवा फोटो काढला गेला, म्हणून त्यात चूक ठरवणं चुकीचं आहे.”

या पार्श्वभूमीवर, विरोधकांनी मात्र चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागलं असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

1 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

14 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

20 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

20 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

21 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

21 तास ago