महाराष्ट्र

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी जाहीरपणे माफी मागितली असली, तरी पीडित आईने ती ठामपणे नाकारत न्यायाची मागणी केली आहे.

“हात जोडून माफी मागतो”; वडिलांचा पश्चात्ताप

आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी आपली चूक मान्य केली.“माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वकिलांमार्फत पीडित कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्या आईसमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही. न्यायालय जो आदेश देईल तो मला मान्य आहे. त्यांच्या दुःखाची भरपाई मी करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.

“माफीने माझा मुलगा परत येईल का?” – आईचा काळजाला भिडणारा प्रश्न

साहिलची आई इन्ना माकन यांनी आरोपीच्या वडिलांची माफी फेटाळून लावत तीव्र प्रतिक्रिया दिली.“कशासाठी माफी? माझं आयुष्य संपवल्याबद्दल की प्रकरण मीडियात आलं म्हणून? माफ करा, पण मी तुमची माफी स्वीकारू शकत नाही. जर हाच अपघात तुमच्या मुलासोबत झाला असता, तर तुम्ही माफी दिली असती का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “आता माझ्यासाठी ना सकाळ उरली आहे ना संध्याकाळ. कामावर जाण्याचं किंवा झोपेतून उठण्याचं कारण उरलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता माफी मागून काय उपयोग?”

नेमकं काय घडलं?

३ फेब्रुवारी रोजी द्वारका परिसरात रील बनवण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची स्कॉर्पियो भरधाव वेगात चालवत साहिल धनेश्रा यांना धडक दिली. या अपघातात साहिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आरोपीचे वडील व्यवसायानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलाला वाहनाची चावी देणे, तसेच त्याच्या स्टंटबाजीकडे दुर्लक्ष करणे या पालकांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.

न्यायाची प्रतीक्षा

या प्रकरणात अल्पवयीन आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, पालकांची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीडित कुटुंब न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवून कठोर शिक्षेची मागणी करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

3 मिनिटे ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

8 मिनिटे ago

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील…

15 मिनिटे ago

तगाद्याला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: वाठार निंबाळकर येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय…

18 मिनिटे ago

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला…

25 मिनिटे ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ…

32 मिनिटे ago