महाराष्ट्र

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी जाहीरपणे माफी मागितली असली, तरी पीडित आईने ती ठामपणे नाकारत न्यायाची मागणी केली आहे.

“हात जोडून माफी मागतो”; वडिलांचा पश्चात्ताप

आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी आपली चूक मान्य केली.“माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वकिलांमार्फत पीडित कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण त्या आईसमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही. न्यायालय जो आदेश देईल तो मला मान्य आहे. त्यांच्या दुःखाची भरपाई मी करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.

“माफीने माझा मुलगा परत येईल का?” – आईचा काळजाला भिडणारा प्रश्न

साहिलची आई इन्ना माकन यांनी आरोपीच्या वडिलांची माफी फेटाळून लावत तीव्र प्रतिक्रिया दिली.“कशासाठी माफी? माझं आयुष्य संपवल्याबद्दल की प्रकरण मीडियात आलं म्हणून? माफ करा, पण मी तुमची माफी स्वीकारू शकत नाही. जर हाच अपघात तुमच्या मुलासोबत झाला असता, तर तुम्ही माफी दिली असती का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या, “आता माझ्यासाठी ना सकाळ उरली आहे ना संध्याकाळ. कामावर जाण्याचं किंवा झोपेतून उठण्याचं कारण उरलं नाही. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता माफी मागून काय उपयोग?”

नेमकं काय घडलं?

३ फेब्रुवारी रोजी द्वारका परिसरात रील बनवण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची स्कॉर्पियो भरधाव वेगात चालवत साहिल धनेश्रा यांना धडक दिली. या अपघातात साहिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आरोपीचे वडील व्यवसायानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलाला वाहनाची चावी देणे, तसेच त्याच्या स्टंटबाजीकडे दुर्लक्ष करणे या पालकांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे.

न्यायाची प्रतीक्षा

या प्रकरणात अल्पवयीन आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, पालकांची जबाबदारी आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या वाढत्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पीडित कुटुंब न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास ठेवून कठोर शिक्षेची मागणी करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

8 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

8 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

8 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

8 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

13 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

13 तास ago