बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत.
सहकऱ्याचा जबाब ठरतोय निर्णायक?
एकेकाळी कराडचे निकटवर्तीय मानले जाणारे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा महत्त्वपूर्ण जबाब नोंदवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बांगर यांनी आपल्या जबाबात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचेही नाव घेतल्याचे समजते. या खुलाशामुळे कराड कुटुंबाच्या अडचणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसआयटी तपासाला वेग
महादेव मुंडे यांच्या हत्येमागील कट, संबंधित व्यक्ती आणि घटनाक्रम याबाबत बांगर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. या जबाबामुळे तपास यंत्रणांना ठोस धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.या दोन्ही प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असून, तपासाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्को टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून, त्यातूनही महत्त्वाचे धागे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कडक कारवाईची मागणी
सध्या वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यातच महादेव मुंडे हत्येप्रकरणातील नव्या खुलाशांमुळे त्याच्याविरोधातील कायदेशीर कारवाई अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यभरातील जनतेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, पुढील काही दिवसांत तपासातून आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…