महाराष्ट्र

दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: ‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘पँथर’ या दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

​मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी ‘दलित पँथर’च्या या विशेषांकाचे संपादन केले आहे. नुकतेच या विशेषांकाचे प्रकाशन मातोश्री येथे मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मा. सुभाष देसाई, सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी लेखक, दलित पँथरचे एक संस्थापक अर्जुन डांगळे, परिवर्तनाचा वाटसरूचे संपादक अभय कांता, फुले आंबेडकरी वाङमयकोशाचे संपादक डॉ. महेंद्र भवरे, ज्येष्ठ कवयित्री हिरा बनसोडे, उर्मिला पवार, प्रज्ञा पवार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुनील कदम, चित्रकार प्रकाश भिसे, डॉ. विजय पट्टेबहादूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या विशेषांकामध्ये दलित पँथर चळवळीचा आढावा, पँथर्सचे स्वकथन, पँथर्स विषयी स्मरण लेख, मुलाखती, तसेच पँथर्स विषयीच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. पँथरकडे जुनी पिढी, बुद्धीजीवी, आजची तरुणाई कोणत्या दृष्टीकोनातून पाहते याचाही वेध या अंकात घेण्यात आला आहे. सोबतच पँथर्सचे काही दुर्मिळ दस्तऐवज या विशेषांकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

7 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

7 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

7 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

7 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

9 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

9 तास ago