महाराष्ट्र

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून इथे जवळपास ३५० स्टॉल लागले आहेत. मात्र या स्टॉल धारकांना सोयी सुविधा देखील आयोजकांनी पुरवल्या नाहीत त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलना दोन कोटीचे अनुदान दिले आहे. इथे जवळपास ३५० स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलसाठी आयोजकांनी ७००० रुपये भाडे घेतले आहे. एवढे पैसे घेऊनही पुरेशा सुविधा स्टॉलधारकांना देता येत नसतील तर साहित्य संमेलन आयोजन करण्यात काय अर्थ आहे असा सवाल प्रकाशात करत आहेत.

राज्यातील काही नामांकित प्रकाशकांनी सांगितले की आयोजकांनी स्टॉल साठी तीन दिवसाचे ७०००₹ भाडे घेतले, त्यात एका व्यक्तीची होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करु असे सांगितले होते. मात्र अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. आम्ही सध्या स्वखर्चाने राहतात, तसेच पाण्याची सोय नाही पुरेशी शौचालयाची व्यवस्था नाही. इतक्या स्टॉल्सवर फक्त ६ शौचालय आहेत. जे लोक स्टॉलवर राहत आहेत त्यांना रात्री डासांचा प्रचंड त्रास होत आहे. संध्याकाळी 7 नंतर स्टॉलवर बसणे देखील अशक्य होत आहे.

पंखा नाही इतर सोयी नाहीत…

अनेकांचा खर्च देखील निघालेला नाही. साहित्य संमेलनाला लोकांची गर्दी देखील खूपच कमी आहे स्थानिक लोक हिंदी भाषेत बोलणारे जास्त आहेत त्यामुळे पुस्तक विक्रीला अतिशय थंड प्रतिसाद मिळतोत. तीन दिवसांच्या संमेलनात काल शुक्रवारी काही स्टॉलधारकांची बोहणीही झाली नव्हती.

काही नामांकित प्रकाशकानी दहा ते पंधरा स्टॉल घेतले आहेत आणि हे लोक बसून आहे. एकाच प्रकाशकाने सांगितले की, दोन दिवसात १५०० रुपयाची देखील पुस्तक विक्री झाली नाही, नाशिक जळगाव पुणे मुंबई येथून येण्याजाण्याचा राहण्याचा जवळपास 15 हजार रुपये खर्च आहे. मात्र पुस्तक विक्रीला सुद्धा हवा तसा प्रतिसाद नाही.

आतापर्यंत ९५ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडली मात्र अनेक प्रकाशक आणि विक्रेते देखील आवाज करत नसल्याने सगळ घडत. प्रकाशक, विक्रेत्यांनी आवाज उठवला असता तर आयोजकांनी काहीतरी व्यवस्था केली असती. दरवर्षी पाण्याचा ,राहण्याचा अशाच समस्या येत असतील तर त्याला काही अर्थ नाही. इतके पैसे घेतले जात असतील तर किमान स्थानिक ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदी करायला पाहिजे ना! कदाचित उद्या सकाळपासून प्रकाशक परत फिरण्याची देखील शक्यता आहे, असे मराठवाड्यातील एका मोठ्या प्रकाशकाने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! दुष्काळी डोंगररांगांमधून सागर शिंदे यांची यशाची भरारी

पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…

3 तास ago

शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा फायरींग प्रकरणातील दोन मुख्य सराईत आरोपी साताऱ्यातून जेरबंद

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…

17 तास ago

जेजुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन

संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…

18 तास ago

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

19 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

20 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरुर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे तर उपाध्यक्षपदी सुनिल जिते

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

21 तास ago