महाराष्ट्र

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून इथे जवळपास ३५० स्टॉल लागले आहेत. मात्र या स्टॉल धारकांना सोयी सुविधा देखील आयोजकांनी पुरवल्या नाहीत त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलना दोन कोटीचे अनुदान दिले आहे. इथे जवळपास ३५० स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलसाठी आयोजकांनी ७००० रुपये भाडे घेतले आहे. एवढे पैसे घेऊनही पुरेशा सुविधा स्टॉलधारकांना देता येत नसतील तर साहित्य संमेलन आयोजन करण्यात काय अर्थ आहे असा सवाल प्रकाशात करत आहेत.

राज्यातील काही नामांकित प्रकाशकांनी सांगितले की आयोजकांनी स्टॉल साठी तीन दिवसाचे ७०००₹ भाडे घेतले, त्यात एका व्यक्तीची होस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करु असे सांगितले होते. मात्र अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही. आम्ही सध्या स्वखर्चाने राहतात, तसेच पाण्याची सोय नाही पुरेशी शौचालयाची व्यवस्था नाही. इतक्या स्टॉल्सवर फक्त ६ शौचालय आहेत. जे लोक स्टॉलवर राहत आहेत त्यांना रात्री डासांचा प्रचंड त्रास होत आहे. संध्याकाळी 7 नंतर स्टॉलवर बसणे देखील अशक्य होत आहे.

पंखा नाही इतर सोयी नाहीत…

अनेकांचा खर्च देखील निघालेला नाही. साहित्य संमेलनाला लोकांची गर्दी देखील खूपच कमी आहे स्थानिक लोक हिंदी भाषेत बोलणारे जास्त आहेत त्यामुळे पुस्तक विक्रीला अतिशय थंड प्रतिसाद मिळतोत. तीन दिवसांच्या संमेलनात काल शुक्रवारी काही स्टॉलधारकांची बोहणीही झाली नव्हती.

काही नामांकित प्रकाशकानी दहा ते पंधरा स्टॉल घेतले आहेत आणि हे लोक बसून आहे. एकाच प्रकाशकाने सांगितले की, दोन दिवसात १५०० रुपयाची देखील पुस्तक विक्री झाली नाही, नाशिक जळगाव पुणे मुंबई येथून येण्याजाण्याचा राहण्याचा जवळपास 15 हजार रुपये खर्च आहे. मात्र पुस्तक विक्रीला सुद्धा हवा तसा प्रतिसाद नाही.

आतापर्यंत ९५ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडली मात्र अनेक प्रकाशक आणि विक्रेते देखील आवाज करत नसल्याने सगळ घडत. प्रकाशक, विक्रेत्यांनी आवाज उठवला असता तर आयोजकांनी काहीतरी व्यवस्था केली असती. दरवर्षी पाण्याचा ,राहण्याचा अशाच समस्या येत असतील तर त्याला काही अर्थ नाही. इतके पैसे घेतले जात असतील तर किमान स्थानिक ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदी करायला पाहिजे ना! कदाचित उद्या सकाळपासून प्रकाशक परत फिरण्याची देखील शक्यता आहे, असे मराठवाड्यातील एका मोठ्या प्रकाशकाने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

15 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

17 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

21 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

22 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

22 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

22 तास ago