महाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेनं ‘अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना केला रद्द, खातेदारांच्या रकमेचं काय

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेनं (RBI) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने काल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून बँक सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहे.

बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँकेचा लिक्विडेशन सुरु करून एक लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

लिक्विडेशन प्रक्रियेनंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीसीसी) कडून पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीच्या विम्याचा दाव्याचा लाभ मिळवता येईल. ३ एप्रिल २०२५ पर्यंत, डीआयसीसीसीने २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत, आणि ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण रक्कमेचा दावा करण्याचा हक्क आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया (DICGC Claim Process)

1) डीपॉझिट इन्शुरन्स ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. जेव्हा बँकेचा परवाना रद्द होतो, तेव्हा लिक्विडेटर DICGC ला ठेवीदारांची यादी पाठवतो.

2) तुमच्या खात्याची पुष्टी केली जाते लिक्विडेटर सर्व खातेदारांची तपशीलवार माहिती DICGC ला देतो:

नाव

खाते क्रमांक

ठेव रक्कम

KYC दस्तऐवज (जसे की आधार, पॅन कार्ड)

3) DICGC कडून पैसे पाठवले जातात* – एकदा खात्याची पडताळणी झाली की, ९० दिवसांच्या आत ₹५ लाखांपर्यंतची रक्कम संबंधित खातेदाराच्या दुसऱ्या खात्यात थेट जमा केली जाते.

4) जर तुमचं KYC पूर्ण नसेल* तर तुम्हाला लिक्विडेटरशी संपर्क करून KYC अपडेट करावी लागेल.

कुठे संपर्क करावा?

बँकेच्या मुख्य शाखेशी / लिक्विडेटरशी संपर्क करा

तुमचं KYC पूर्ण आहे का, याची खात्री करा

तुमचा दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक द्या (ज्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होऊ शकेल).

महत्त्वाचं

तुम्हाला कोठेही धावपळ करण्याची गरज नाही

सगळी प्रक्रिया DICGC व लिक्विडेटर मार्फत पार पडते

तुमचं फक्त KYC अपडेट असणं आवश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

17 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

17 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

17 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

17 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

19 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

19 तास ago