महाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेनं ‘अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना केला रद्द, खातेदारांच्या रकमेचं काय

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेनं (RBI) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने काल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून बँक सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहे.

बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँकेचा लिक्विडेशन सुरु करून एक लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

लिक्विडेशन प्रक्रियेनंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीसीसी) कडून पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीच्या विम्याचा दाव्याचा लाभ मिळवता येईल. ३ एप्रिल २०२५ पर्यंत, डीआयसीसीसीने २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत, आणि ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण रक्कमेचा दावा करण्याचा हक्क आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया (DICGC Claim Process)

1) डीपॉझिट इन्शुरन्स ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. जेव्हा बँकेचा परवाना रद्द होतो, तेव्हा लिक्विडेटर DICGC ला ठेवीदारांची यादी पाठवतो.

2) तुमच्या खात्याची पुष्टी केली जाते लिक्विडेटर सर्व खातेदारांची तपशीलवार माहिती DICGC ला देतो:

नाव

खाते क्रमांक

ठेव रक्कम

KYC दस्तऐवज (जसे की आधार, पॅन कार्ड)

3) DICGC कडून पैसे पाठवले जातात* – एकदा खात्याची पडताळणी झाली की, ९० दिवसांच्या आत ₹५ लाखांपर्यंतची रक्कम संबंधित खातेदाराच्या दुसऱ्या खात्यात थेट जमा केली जाते.

4) जर तुमचं KYC पूर्ण नसेल* तर तुम्हाला लिक्विडेटरशी संपर्क करून KYC अपडेट करावी लागेल.

कुठे संपर्क करावा?

बँकेच्या मुख्य शाखेशी / लिक्विडेटरशी संपर्क करा

तुमचं KYC पूर्ण आहे का, याची खात्री करा

तुमचा दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक द्या (ज्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होऊ शकेल).

महत्त्वाचं

तुम्हाला कोठेही धावपळ करण्याची गरज नाही

सगळी प्रक्रिया DICGC व लिक्विडेटर मार्फत पार पडते

तुमचं फक्त KYC अपडेट असणं आवश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

10 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

10 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

10 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

10 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

10 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

10 तास ago