महाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेनं ‘अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना केला रद्द, खातेदारांच्या रकमेचं काय

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेनं (RBI) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने काल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून बँक सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहे.

बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँकेचा लिक्विडेशन सुरु करून एक लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

लिक्विडेशन प्रक्रियेनंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीसीसी) कडून पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीच्या विम्याचा दाव्याचा लाभ मिळवता येईल. ३ एप्रिल २०२५ पर्यंत, डीआयसीसीसीने २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत, आणि ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण रक्कमेचा दावा करण्याचा हक्क आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया (DICGC Claim Process)

1) डीपॉझिट इन्शुरन्स ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. जेव्हा बँकेचा परवाना रद्द होतो, तेव्हा लिक्विडेटर DICGC ला ठेवीदारांची यादी पाठवतो.

2) तुमच्या खात्याची पुष्टी केली जाते लिक्विडेटर सर्व खातेदारांची तपशीलवार माहिती DICGC ला देतो:

नाव

खाते क्रमांक

ठेव रक्कम

KYC दस्तऐवज (जसे की आधार, पॅन कार्ड)

3) DICGC कडून पैसे पाठवले जातात* – एकदा खात्याची पडताळणी झाली की, ९० दिवसांच्या आत ₹५ लाखांपर्यंतची रक्कम संबंधित खातेदाराच्या दुसऱ्या खात्यात थेट जमा केली जाते.

4) जर तुमचं KYC पूर्ण नसेल* तर तुम्हाला लिक्विडेटरशी संपर्क करून KYC अपडेट करावी लागेल.

कुठे संपर्क करावा?

बँकेच्या मुख्य शाखेशी / लिक्विडेटरशी संपर्क करा

तुमचं KYC पूर्ण आहे का, याची खात्री करा

तुमचा दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक द्या (ज्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होऊ शकेल).

महत्त्वाचं

तुम्हाला कोठेही धावपळ करण्याची गरज नाही

सगळी प्रक्रिया DICGC व लिक्विडेटर मार्फत पार पडते

तुमचं फक्त KYC अपडेट असणं आवश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

15 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

22 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago