महाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेनं ‘अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके’चा परवाना केला रद्द, खातेदारांच्या रकमेचं काय

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेनं (RBI) परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने काल मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून बँक सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहे.

बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँकेचा लिक्विडेशन सुरु करून एक लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

लिक्विडेशन प्रक्रियेनंतर, प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीसीसी) कडून पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीच्या विम्याचा दाव्याचा लाभ मिळवता येईल. ३ एप्रिल २०२५ पर्यंत, डीआयसीसीसीने २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत, आणि ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या पूर्ण रक्कमेचा दावा करण्याचा हक्क आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम प्रक्रिया (DICGC Claim Process)

1) डीपॉझिट इन्शुरन्स ही स्वयंचलित प्रक्रिया आहे. जेव्हा बँकेचा परवाना रद्द होतो, तेव्हा लिक्विडेटर DICGC ला ठेवीदारांची यादी पाठवतो.

2) तुमच्या खात्याची पुष्टी केली जाते लिक्विडेटर सर्व खातेदारांची तपशीलवार माहिती DICGC ला देतो:

नाव

खाते क्रमांक

ठेव रक्कम

KYC दस्तऐवज (जसे की आधार, पॅन कार्ड)

3) DICGC कडून पैसे पाठवले जातात* – एकदा खात्याची पडताळणी झाली की, ९० दिवसांच्या आत ₹५ लाखांपर्यंतची रक्कम संबंधित खातेदाराच्या दुसऱ्या खात्यात थेट जमा केली जाते.

4) जर तुमचं KYC पूर्ण नसेल* तर तुम्हाला लिक्विडेटरशी संपर्क करून KYC अपडेट करावी लागेल.

कुठे संपर्क करावा?

बँकेच्या मुख्य शाखेशी / लिक्विडेटरशी संपर्क करा

तुमचं KYC पूर्ण आहे का, याची खात्री करा

तुमचा दुसऱ्या बँकेचा खाते क्रमांक द्या (ज्यामध्ये रक्कम ट्रान्सफर होऊ शकेल).

महत्त्वाचं

तुम्हाला कोठेही धावपळ करण्याची गरज नाही

सगळी प्रक्रिया DICGC व लिक्विडेटर मार्फत पार पडते

तुमचं फक्त KYC अपडेट असणं आवश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago