महाराष्ट्र

राज्यात ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला वेग; रोस्टर पूर्ण होताच महाविद्यालयांना एनओसी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ५,०१२ सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला शासनाने गती दिली असून, आवश्यक कार्यवाही पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली असून २३ मार्च २०२६ रोजी या पदांचे समन्यायी पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १७२ पदांसह ही राज्यातील गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठी प्राध्यापक भरती प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, पूर्वी मंजूर झालेल्या सुमारे २,९०० पदांची भरतीही विद्यमान सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार विषयनिहाय कार्यभार निश्चित करून पदांचे वाटप करण्यात आले आहे.

प्रत्येक विषयात किमान ५० टक्के पदे भरण्याची अट ठेवण्यात आली असून, ज्या विषयांमध्ये एकही शिक्षक कार्यरत नाही अशा विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक विषयांसाठी किमान शिक्षक उपलब्ध होतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेसाठी ‘डीएचई एनओसी’ पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून, रोस्टर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांना त्याद्वारे एनओसी दिली जाणार आहे. रोस्टर पूर्ण झाल्यानंतर एनओसी देण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये पदोन्नतीमुळे रिक्त पदे कमी होणे किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे मागील भरतीत ५०० हून अधिक पदे रिक्त राहिल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, भरती प्रक्रियेदरम्यान संस्थांना येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी विभागीय सहसंचालकांनी आठवड्यातील ठरावीक वेळ राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चंद्रपूरमध्ये उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त संचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी नागपूरला जावे लागू नये, यासाठी…

2 तास ago

आधुनिक शिक्षण क्रांतीशिवाय ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार होणार नाही

मुंबई: भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वाधिक परिवर्तनाची अपेक्षा ज्या क्षेत्राकडून आहे,…

2 तास ago

केंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे; राज्याने केंद्राशी समन्वय साधावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या…

3 तास ago

लोकशाही वाचवा निर्धार सभा; नागरिकत्व आणि लोकशाही धोक्यात असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित "लोकशाही वाचवा निर्धार सभा"…

3 तास ago

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक ऐतिहासिक; महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-२०२६’ हे केवळ कायदा नसून मातीत जीव ओतणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला,…

3 तास ago

15 वर्षांनंतर कोठडीतील मृत्यू प्रकरणी ऐतिहासिक निकाल; 9 पोलिसांना जन्मठेप

वाशिम: वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने 2011 मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह…

3 तास ago