मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघूदत या शासकीय निवासस्थानी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्न व लक्षवेधी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच म्हाडा पुनर्विकासातील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आमदारांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे नमूद करण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता आणि समन्वयात्मक भूमिका प्रशंसनीय असल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली.
पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार…
मुंबई: शिवसेना महिला सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई पोलीस…
पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना…
शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान…
मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व…
रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…