मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघूदत या शासकीय निवासस्थानी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्न व लक्षवेधी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच म्हाडा पुनर्विकासातील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आमदारांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे नमूद करण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता आणि समन्वयात्मक भूमिका प्रशंसनीय असल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली.
मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…
मुंबई : नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि…
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील…
मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला…
शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार…
मुंबई : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी…