महाराष्ट्र

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात

प्रवास होणार वेगवान

पुणे: पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेले खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, यातील एक बोगदा शनिवारपासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास लवकरच कमी होणार आहे.

पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट हा एस-आकाराच्या तीव्र वळणांमुळे नेहमीच अपघातप्रवण आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत होता. अनेकदा या घाटातून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना ३० ते ४५ मिनिटांचा वेळ लागत होता. मात्र बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांत होणार असून तब्बल २० मिनिटांची बचत होणार आहे.

दोन अत्याधुनिक बोगद्यांचे काम अंतिम टप्प्यात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खंबाटकी घाटात दोन स्वतंत्र बोगदे उभारण्यात येत आहेत. पुण्याच्या दिशेने आणि साताराच्या दिशेने असे दोन बोगदे असून प्रत्येक बोगद्यात तीन लेनची सुविधा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

साताराहून पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा १७ जानेवारीपासून सर्वसामान्य वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र बोगद्याच्या उताऱ्याजवळ दरी पुलाचे काम सुरू असल्याने सध्या फक्त हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जड वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.

अपघात आणि वाहतूक कोंडीवर आळा

खंबाटकी घाटातील तीव्र वळणे, अरुंद रस्ता आणि दुहेरी वाहतुकीमुळे वारंवार अपघात आणि मोठी वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या लक्षात घेऊनच २०१९ मध्ये बोगद्यांचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. कोरोना काळात कामात अडथळे आले असले तरी आता हा प्रकल्प वेगाने पूर्णतेकडे जात आहे.

मार्च २०२६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार

डाव्या बाजूचा बोगदा १३०० मीटर तर उजव्या बाजूचा बोगदा १२२४ मीटर लांबीचा आहे. पुण्याच्या दिशेने बोगदा संपल्यानंतर उभारण्यात येणाऱ्या दरी पुलाचे काम सध्या १४ ते १५ टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान शनिवारी एका बोगद्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहासजमा होणार आहे. यामुळे पुणे–सातारा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

10 मिनिटे ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

18 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

5 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

5 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

5 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

5 तास ago