महाराष्ट्र

राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी  असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे  आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या विषयी नियम ९७ नुसार सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विश्रामगृहाबाबत नियम ९७ अंतर्गत सविस्तर चर्चा करावी आणि  सर्वांचे समाधान व्हावे” असे निर्देश  उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच विसावा विश्रामगृहाची पुनर्बांधणी झाली असल्याचे कळते आहे. त्यालाही आपण सर्वांनी मिळून  भेट देऊ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील शासकीय  विश्रामगृहाची दूरावस्था या विषयावर ज्येष्ठ सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यानी प्रश्न उपस्थित केला. आ प्रविण दरेकर, आ सतेज पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. मात्र याप्रश्नाबाबत सदस्यांना सविस्तर बोलायचे असल्याने आणि याविषयावर सर्वाचे  समाधान होणे आवश्यक असल्याने सविस्तर चर्चा घेणार असल्याचे डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

2 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

2 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

2 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

2 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

2 तास ago

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…

2 तास ago