महाराष्ट्र

राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी  असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे  आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या विषयी नियम ९७ नुसार सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात राज्यातील विश्रामगृहाबाबत नियम ९७ अंतर्गत सविस्तर चर्चा करावी आणि  सर्वांचे समाधान व्हावे” असे निर्देश  उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच विसावा विश्रामगृहाची पुनर्बांधणी झाली असल्याचे कळते आहे. त्यालाही आपण सर्वांनी मिळून  भेट देऊ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील शासकीय  विश्रामगृहाची दूरावस्था या विषयावर ज्येष्ठ सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यानी प्रश्न उपस्थित केला. आ प्रविण दरेकर, आ सतेज पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. मात्र याप्रश्नाबाबत सदस्यांना सविस्तर बोलायचे असल्याने आणि याविषयावर सर्वाचे  समाधान होणे आवश्यक असल्याने सविस्तर चर्चा घेणार असल्याचे डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

15 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

20 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

36 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

42 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

44 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago