छत्रपती संभाजीनगर: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार आणि दर मोठ्या प्रमाणात वाढणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. या अफवांमुळे मराठवाड्यात काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, सध्या इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असून कोणतीही घबराट करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, युद्धामुळे तात्काळ कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत. इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून वितरण व्यवस्थेत कोणतीही अडचण नाही.
मराठवाड्यात काही ठिकाणी लांब रांगा
अफवा पसरल्यानंतर ३ मार्चच्या संध्याकाळपासून छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी लांबच लांब रांगा लावल्या. अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी तात्पुरता साठा संपल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावावे लागले. मात्र हा प्रकार काही तासांतच नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले.
अफवा कशामुळे वाढली?
युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात बंद होईल, अशी भीती काही नागरिकांमध्ये निर्माण झाली. त्यातच रविवार आणि धूलिवंदनामुळे काही पंप तात्पुरते बंद असल्याने गैरसमज अधिक वाढला. परिणामी सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांमुळे परिस्थिती चिघळली.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, अनावश्यक गर्दी टाळावी आणि अप्रमाणित संदेश पुढे पाठवू नयेत, असे आवाहन प्रशासन व पेट्रोल पंप संघटनांकडून करण्यात आले आहे.सध्या इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून घबराट करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…