मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित करत, संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर आणि भू-माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली.
बुद्ध लेणी बचाव कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, पहाडसिंगपुरा परिसरातील प्राचीन बौद्ध लेणी तसेच हरसूल तलावापर्यंतच्या गायरान जमिनीवर मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने अहोरात्र मुरुम व मातीचे अवैध उत्खनन सुरू आहे. यामुळे पुरातत्त्वदृष्ट्या अत्यंत संवेदनशील टेकड्या आणि लेणींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.
मागील एक वर्षापासून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार स्तरावरील अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रशासनाकडून केवळ नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पडत असले, तरी प्रत्यक्षात दंडात्मक वसुली किंवा ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. रॉयल्टी चोरी आणि दंडात्मक कारवाईबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
याचबरोबर गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अवैध उत्खनन करणाऱ्या भू-माफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात अवैध उत्खननाविरोधात किती वाहनांवर कारवाई केली आणि किती दंड प्रत्यक्ष वसूल केला, याचा सविस्तर अहवाल विधानसभेसमोर सादर करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…