SARPANCH
मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या गट, गणातील, प्रभागातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये आवर्जून संधी दिली जाणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीसाठी इच्छुक भावी सदस्य सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीस इच्छुकांचा प्रचार करीत आहेत.
जनतेतून निवडलेल्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताने मांडला जाऊ शकतो, ज्यासाठी ठराव मांडण्यापूर्वी सदस्यांनी त्याबाबत नोटीस दिली पाहिजे. हा ठराव ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये ठेवला जातो आणि त्यावेळी मंजुरी मिळाल्यास सरपंच पदावरून हटविले जाते.
राज्यात २०१७ मध्ये थेट सरपंच निवडण्याचा निर्णय झाला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर तो निर्णय रद्द करून पुन्हा बहुमतातून सरपंच निवडीचा निर्णय झाला. आता पुन्हा महायुती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला सरपंचपदाच्या उमेदवारास एक व त्यांच्या प्रभागातील पसंतीच्या उमेदवारास एक, अशी दोन मते द्यावी लागतील.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…