महाराष्ट्र

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, फेब्रुवारी २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या गट, गणातील, प्रभागातील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये आवर्जून संधी दिली जाणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीसाठी इच्छुक भावी सदस्य सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीस इच्छुकांचा प्रचार करीत आहेत.

जनतेतून निवडलेल्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताने मांडला जाऊ शकतो, ज्यासाठी ठराव मांडण्यापूर्वी सदस्यांनी त्याबाबत नोटीस दिली पाहिजे. हा ठराव ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये ठेवला जातो आणि त्यावेळी मंजुरी मिळाल्यास सरपंच पदावरून हटविले जाते.

राज्यात २०१७ मध्ये थेट सरपंच निवडण्याचा निर्णय झाला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर तो निर्णय रद्द करून पुन्हा बहुमतातून सरपंच निवडीचा निर्णय झाला. आता पुन्हा महायुती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला सरपंचपदाच्या उमेदवारास एक व त्यांच्या प्रभागातील पसंतीच्या उमेदवारास एक, अशी दोन मते द्यावी लागतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

2 तास ago

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…

6 तास ago

गॅसमुळे छातीत होणाऱ्या त्रासाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पर्याय

छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…

6 तास ago

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…

6 तास ago

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…

7 तास ago

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…

7 तास ago