महाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा वाद उच्च न्यायालयात; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला आव्हान

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू झालेला राजकीय वाद आता उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचणार आहे. बहुमत नसतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडून भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अपेक्षित वेगाने सुनावणी होत नसल्याने आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तक्रारदारांचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांची निवड नियमबाह्य असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सुरुवातीला सुनावणी झाली; मात्र त्यानंतर पुढील सुनावणीला विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांनी प्रकरणाची सुनावणी ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करावी, अशी मागणी आता उच्च न्यायालयात करण्यात येणार असल्याचे ॲड. घोडके यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी नियम डावलून चुकीच्या प्रकारांना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित पक्षांनी केली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याने सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेतच हा कार्यकाळ संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घेऊन निर्णय देणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

‘कार्यकाळ संपण्यापूर्वी निर्णय हवा’

“एक महिन्याच्या आत पुढील तारीख देणे अपेक्षित असताना तसे झालेले नाही. सुनावणीची अंतिम नोटीसही देण्यात आलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विभागीय आयुक्तांना सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित करून देण्याची मागणी करणार आहोत,” असे ॲड. घोडके यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष-उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ लक्षात घेता सुनावणी लांबल्यास पक्षकारांच्या न्यायाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘महा वॉकेथॉन २०२६’मध्ये संजय दत्त यांचा सहभाग; २१ ऑगस्टला राज्यातील ३६ जिल्ह्यांत आयोजन

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने…

1 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विद्यापीठांनी तत्परतेने कार्यवाही करावी; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा आणि विद्यार्थीपूरक वातावरण उपलब्ध करून देणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे.…

1 तास ago

स्वस्तिका घोष यांच्या सुवर्णयशाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: २२व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक…

1 तास ago

पुण्याला २०३२ ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’चे यजमानपद मिळणार? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: पुणे येथे २०३२ मध्ये ‘यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यासाठी निविदा सादर करण्यास महाराष्ट्र…

1 तास ago

‘लकी शनिवार’ अन् दादर लोकलमध्ये चोरी! ६५ वर्षीय आज्जीचा पर्दाफाश

मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे…

1 तास ago

लावणी हवी, लावणीच्या नावाखालील अश्लीलता नको!

मुंबई: लावणी म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली कला. तिच्या ठेक्यात महाराष्ट्राचा इतिहास आहे, शब्दांत लोकजीवन आहे…

1 तास ago