महाराष्ट्र

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; ईव्ही गाडीचा वापर सुरू, परदेश दौऱ्यांनाही कात्री

ठाणे: देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केले. ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू करत असल्याचे सांगत शिंदे यांनी आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला. आपल्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहात जाताना त्यांनी ईव्ही गाडीचा वापर केला. तसेच सुरक्षा रक्षकांची वाहने वगळता ताफ्यातील अन्य वाहनांची संख्या कमी करण्याचाही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑईल आयात करतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून इंधन बचतीवर भर देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने संयमित पद्धतीने इंधनाचा वापर केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल आणि आसाममधील निवडणूक निकालांचा उल्लेख करत मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे सांगितले. तसेच विरोधकांनी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहन करत काँग्रेस नेते यांच्यावर टीका केली. “देशातील जनता सुज्ञ आहे. ‘हे पब्लिक है, सब जानती है’. त्यामुळे सरकारच्या आवाहनाला सर्वांनी साथ द्यावी,” असे ते म्हणाले.

“मोदीजी नेहमी ‘नेशन फर्स्ट’ या विचाराने निर्णय घेतात. त्यामुळे मी स्वतः इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील शिवसेनेच्या मंत्र्यांनाही ईव्ही वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री यांनीदेखील राज्य सरकार पंतप्रधानांच्या आवाहनाला पूर्ण क्षमतेने प्रतिसाद देत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. युद्धजन्य परिस्थितीचा कमीत कमी फटका नागरिकांना बसावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री यांनी आपला कौटुंबिक युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नगरविकास विभागाच्या डेन्मार्क दौऱ्यालाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनीही काटकसरीच्या निर्णयांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

मुंबई: राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची…

1 तास ago

रायगड पर्यटन विकासाला गती; प्रलंबित कामांसाठी निधी देणार; शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांना गती देत आवश्यक निधी…

2 तास ago

पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई

मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून,…

2 तास ago

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावाला बुधवार (दि 13) रोजी झालेल्या अवकाळी…

2 तास ago

म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार; शासन सकारात्मक; शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने…

3 तास ago

नाशिक कुंभमेळ्याचा ‘महाप्लॅन’ तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी

जमीन संपादनासाठी २२६७ कोटींची मंजुरी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर…

6 तास ago