महाराष्ट्र

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

मुंबई: राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.या बैठकीस परिवहन आयुक्त , अपर परिवहन आयुक्त तसेच चे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे, सुनील हनवट आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गठित समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येईल. समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगून मंत्री सरनाईक म्हणाले की, सण-उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जातात. प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या अशा प्रवासी बस वाहतूकदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, परिवहन विभागाने नावे बदललेल्या गावांबाबत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेचा वापर करण्याबाबत परिपत्रक जारी करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

राज्यातील एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याचे नमूद करून मंत्री सरनाईक म्हणाले की, बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असून, प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; ईव्ही गाडीचा वापर सुरू, परदेश दौऱ्यांनाही कात्री

ठाणे: देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,…

1 तास ago

रायगड पर्यटन विकासाला गती; प्रलंबित कामांसाठी निधी देणार; शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांना गती देत आवश्यक निधी…

2 तास ago

पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई

मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून,…

2 तास ago

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावाला बुधवार (दि 13) रोजी झालेल्या अवकाळी…

2 तास ago

म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार; शासन सकारात्मक; शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने…

3 तास ago

नाशिक कुंभमेळ्याचा ‘महाप्लॅन’ तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी

जमीन संपादनासाठी २२६७ कोटींची मंजुरी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर…

6 तास ago