मुंबई: चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोघेही घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांना त्यांच्या उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये आणि प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी होणे आवश्यक असल्याचे नमूद करत शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी संबंधित झाडांची छाटणी झाली होती का, याची चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले जातील.
दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेही शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चानंतर त्यांनी विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडल्या.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे लाभ आणि इतर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि सर्व समाजांना न्याय मिळेल, ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, या विषयावर सुमारे २५ आमदारांनीही त्यांची भेट घेतल्याचे सांगत, उद्याच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. चर्चेच्या माध्यमातूनच कोणताही प्रश्न सोडवला जाईल आणि न्याय्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…
मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…
मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…
अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…