मुंबई: चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोघेही घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांना त्यांच्या उपचारात कोणतीही कुचराई होऊ नये आणि प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी होणे आवश्यक असल्याचे नमूद करत शिंदे म्हणाले की, पावसाळ्यापूर्वी संबंधित झाडांची छाटणी झाली होती का, याची चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले जातील.
दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेही शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आनंदराज आंबेडकर, बबनराव घोलप, राजकुमार बडोले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चानंतर त्यांनी विविध मागण्या आणि सूचना शिंदे यांच्यासमोर मांडल्या.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, प्रत्येक समाजाची लोकसंख्या, त्यांना मिळणारे लाभ आणि इतर सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. महायुती सरकार कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि सर्व समाजांना न्याय मिळेल, ही सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, या विषयावर सुमारे २५ आमदारांनीही त्यांची भेट घेतल्याचे सांगत, उद्याच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. चर्चेच्या माध्यमातूनच कोणताही प्रश्न सोडवला जाईल आणि न्याय्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई: मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह देशातील शेकडो तरुणांची आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करून त्यांना…
मुंबई: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होण्यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी…
मुंबई: नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर…
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी…
मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले असून सलग तिसऱ्या…
मुंबई: मराठी रंगभूमीच्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अग्रणी विजया मेहता यांच्या निधनाने मराठी तसेच…