नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पक्षाची भूमिका, मांडणीची रणनीती आणि सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशासमोरील आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे होणारा आर्थिक परिणाम, पुरवठा साखळीतील अडथळे आणि त्यावर केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताला प्राधान्य देणारी असेल.
दरम्यान, विरोधकांकडून उभे केले जात असलेल्या मुद्द्यांना ठामपणे उत्तर देत, “फेक नॅरेटिव्ह”चा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक आणि रचनात्मक भूमिका घेणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शिवसेना ही एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असल्याने केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देत जनहिताचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार खासदारांनी व्यक्त केला.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…