कोल्हापूर: शासन आपल्या दारी हा कार्यक्रम काल मंगळवार (दि. 14) रोजी कोल्हापूर येथे राबवण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मुस्लिम नवदांपत्य आपल्या चिमुकली सोबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा आग्रह करू लागले. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी यांनी तात्काळ उपस्थित स्वयंसेवकांची भेट घालून दिली. भेट का हवी? कारण काय विचारले असता त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून त्यांच्या २६ दिवसांच्या चिमुकलीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले असून आम्हाला कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत असे सांगितले.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ, शासन आपल्या दारी उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ अमोल शिंदे, अमित हुक्केरीकर आणि प्रभाकर काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय यांस अवगत करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सादिक गुलाब मकुभाई या नवदांपत्याकडून आभार पत्र स्विकारले, आणि चिमुकलीला हातात ही घेतले. कौतुकाने या चिमुकलीला न्याहाळत शेजारी असलेल्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांस बाळाला दाखविले. आपल्या चिमुकलीचे प्राण वाचवल्याबद्दल सादिक गुलाब यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आणि सोबत स्वहस्ताक्षरात लिहून आणलेले एक आभार पत्र, कृतज्ञता म्हणून दिले. निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुलीचे नाव काय ठेवलं आहे? या प्रश्नाला अतिशय भावनिक उत्तर देताना, तुमची आमच्या कुटुंबावर दुवा आहे. म्हणून आमच्या मुलीचे नाव हे आम्ही दुवाच ठेवणार असे चिमुकलीच्या आईने उत्तर दिले.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…