महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

“वहिनी सावध असा, झारीतील शुक्राचार्य ओळखा” असा सल्ला

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर लिहिलेल्या दीर्घ आणि भावनिक पोस्टने खळबळ उडवली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या ४८ तासांत सुरू झालेल्या राजकीय हालचालींवर तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे. “दादांची चिता अजून शांतही झाली नाही आणि त्यांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली,” असं म्हणत त्यांनी या घडामोडींना अमानवी आणि क्रूर ठरवलं आहे.

अंधारे यांनी अजित पवारांच्या शेवटच्या दर्शनाचा भावनिक प्रसंगही आपल्या पोस्टमध्ये मांडला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात निष्प्राण अवस्थेत असलेल्या अजित पवारांना पाहिल्याचा क्षण, सुनेत्रा पवार यांची स्थितप्रज्ञ अवस्था आणि त्या काळातील वातावरण याचं त्यांनी अत्यंत हळवे वर्णन केलं आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असताना सुषमा अंधारे यांनी त्यांना थेट सल्लाही दिला आहे. “वहिनी सावध असा,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही दिग्गज नेत्यांकडून होऊ शकणाऱ्या राजकीय डावपेचांबाबत त्यांनी इशारा दिला आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांचा उल्लेख करत “झारीतील शुक्राचार्य ओळखा,” असा सल्ला अंधारेंनी दिला आहे.

सुनेत्रा पवार यांचा शपथविधी भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटू शकतो, मात्र दादांनी उभं केलेलं राजकीय साम्राज्य वाचवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य असल्याचं मतही अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत, कठीण काळात नेतृत्व स्वीकारण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

आपल्या पोस्टच्या शेवटी सुषमा अंधारे म्हणतात की, “आम्ही दादांचे राजकीय विरोधक असलो तरी महिला म्हणून जर सुनेत्रा पवार यांच्यावर अन्याय झाला, तर भगिनीभाव जपत आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू.”सुषमा अंधारेंच्या या पोस्टमुळे सुनेत्रा पवारांचा शपथविधी, राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण आणि अजित पवारांच्या वारशाबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

9 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

9 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

9 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

9 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

9 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

9 तास ago