मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे.
अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात कोणाचीही घरे तोडू नयेत असे मा. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. महाराष्ट्र सरकारचाही स्वत:चा असा शासन आदेश आहे. असे असताना असं अचानक नेमकं काय घडलं की प्रशासनावर भर पावसात घरे तोडण्याची वेळ आली. भर पावसात तोडक कारवाई केल्यानंतर दोन मुलं आज रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलीस प्रशासन, महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी असो सर्व यंत्रणांना उच्च न्यायालयाचा व सरकारचा आदेश लागू होतो. त्यामुळे भर पावसात घरे तोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शेख यांनी घेतली.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पावसाळ्यात कधीच अशा प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही, अशा प्रकारची तोडक कारवाई का झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…