महाराष्ट्र

पावसाळ्यात तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा; आमदार अस्लम शेख

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालवणी, अंबोजवाडीमध्ये भर पावसात २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. काल विधानसभा सभागृहात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमीका घेत भर पावसात लोकांची घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतली आहे.

अस्लम शेख म्हणाले, पावसाळ्यात कोणाचीही घरे तोडू नयेत असे मा. उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. महाराष्ट्र सरकारचाही स्वत:चा असा शासन आदेश आहे. असे असताना असं अचानक नेमकं काय घडलं की प्रशासनावर भर पावसात घरे तोडण्याची वेळ आली. भर पावसात तोडक कारवाई केल्यानंतर दोन मुलं आज रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलीस प्रशासन, महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी असो सर्व यंत्रणांना उच्च न्यायालयाचा व सरकारचा आदेश लागू होतो. त्यामुळे भर पावसात घरे तोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शेख यांनी घेतली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पावसाळ्यात कधीच अशा प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही, अशा प्रकारची तोडक कारवाई का झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

16 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

23 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago