महाराष्ट्र

विधिमंडळाच्या परिसरातील स्वच्छतेसाठी योग्य खबरदारी घ्या…

नागपूर: विधीमंडळ परिसरातील वॉशरूममध्ये चहाचे कप धुतल्या जात असल्याबद्दल चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी दिल्या. तसेच काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावेत असे निर्देश देखील गो-हे यांनी दिले. आमदार निवासातील अस्वच्छतेबाबत अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थीत केल्यानंतर उपसभापतींनी उपरोक्त सूचना केल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवास परिसरात कंत्राटदाराकडून अन्नाची भांडी स्वच्छतागृहाच्या पाण्याने धुतल्याचा मुद्दा मांडला. तसेच यांसदर्भातील व्हिडीओचा पेनड्राईव्ह त्यांनी सभागृहात सादर केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा विषय गंभीर असून संबंधित दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. त्यांनंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सदर प्रकरणावर चिंता व्यक्त केली.

तसेच विधीमंडळ परिसरात आजपासून काचेचे कप वापरुनये तर त्याऐवजी कागदाचे कप वापरावेत. कोरोना साथरोगाच्या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता काचेची भांडी आणि कपांऐवजी सर्व सदस्यांनी कागदी कपात चहा घ्यावा, अशा सूचना उपसभापतींनी दिल्या.

त्यासोबतच आ. मिटकरी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई केली, जावी असेही उपसभापतींनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

5 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

5 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

5 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

5 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

16 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago