नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले.
अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक भाष्य केले. नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ‘माझ्या मोठ्या मुलाला डोळ्याची समस्या होती. त्याला काही दिसत नव्हतं. तो काही पाहू शकतच नव्हतं. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळी मी असा विचार केला की, लोक काय विचार करतील. मी माझ्या मुलाचा विचारच केला नाही.
पुढे बोलताना नाना म्हणाले की, ‘मला माझ्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचो, त्यावेळी नानाच्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील असं वाटायचं. पण मी कधीच त्याला काय वाटतं, तो काय विचार करतो याचा कधी विचारच नाही केला. मी फक्त लोक काय म्हणतील याचं विचारात राहिलो.’
मुलाबद्दल सांगताना नाना म्हणाले की, ‘माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार मी करत बसलो पण त्याला काय वाटतय हे मी पाहिलच नाही. माझ्या मुलाचं नाव दुर्वासा होतं. त्याने आमच्यासोबत फक्त अडीच वर्ष घालवली. प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात. कदाचित त्याचा तेवढाच काळ असेल.
मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण…
वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई:…
शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक…
रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया नागपूर: 18…
शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…
धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…