महाराष्ट्र

लेकाच्या मृत्यूबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले

नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले.

अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेक भाष्य केले. नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ‘माझ्या मोठ्या मुलाला डोळ्याची समस्या होती. त्याला काही दिसत नव्हतं. तो काही पाहू शकतच नव्हतं. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळी मी असा विचार केला की, लोक काय विचार करतील. मी माझ्या मुलाचा विचारच केला नाही.

पुढे बोलताना नाना म्हणाले की, ‘मला माझ्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहायचो, त्यावेळी नानाच्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील असं वाटायचं. पण मी कधीच त्याला काय वाटतं, तो काय विचार करतो याचा कधी विचारच नाही केला. मी फक्त लोक काय म्हणतील याचं विचारात राहिलो.’

मुलाबद्दल सांगताना नाना म्हणाले की, ‘माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार मी करत बसलो पण त्याला काय वाटतय हे मी पाहिलच नाही. माझ्या मुलाचं नाव दुर्वासा होतं. त्याने आमच्यासोबत फक्त अडीच वर्ष घालवली. प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात. कदाचित त्याचा तेवढाच काळ असेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

12 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

12 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

12 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

12 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

12 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

12 तास ago